दिवस ..
खरंच आयुष्यात चांगले दिवस किती आणि वाईट जाणारे दिवस किती येतात हे मी सांगायची गरज नाही ..
आपण सर्वजण हे दिवस अनुभवत असतोच ..
पण कधी कधी ना काही काही दिवस हे खरंच खूप वाईट जातात ..
एखादी भयाण काळीकुट्ट अंधाराची रात्र असावी आणि त्यात भर म्हणून एकदम भयानक असं स्वप्न पडावं असे काही दिवस सर्वांच्या आयुष्यात नक्कीच येतात आणि नंतर काही काळाने निघून सुद्धा जातात ..
पण
या वाईट जाणाऱ्या दिवसांमध्ये तो एक चांगला गेलेला दिवस सुद्धा असतो ..
खरं तर काहीतरी मनासारखं घडलेला ,किंवा काहीतरी अनपेक्षित असं घडून या मनाला अतिशय आनंद देऊन गेलेला तो दिवस असतो ..
त्या दिवसाला मनाच्या एका कप्यात एकदम जपून ठेवा ,त्याची काळजी घ्या ..
कितीही निराशेचे मळभ साचले या मनावर तरी त्या दिवसाच्या आठवणींना झाकून जाऊ देऊ नका ..
कारण या संघर्षाच्या दिवसांमध्ये आणि भयाण स्वप्नांच्या रात्रीत ,तो दिवस ,त्या दिवसाच्या त्या चांगल्या आठवणी ,ते आनंदाचे क्षण याचाच खूप मोठा आधार मिळत असतो या मनाला ..
तेव्हा नक्की जपून ठेवा त्या आठवणी , तो दिवस ...
- सुधीर