Monday 31 March 2014

तूच तू ...

                                 
                                       
         असाच एक मुलगा ,एका मुलीवर जीवापाड प्रेम करणारा ,त्या मुलीन त्याच अख्ख जग व्यापून टाकलेलं असत .. त्याला फक्त जिकडे तिकडे तीच ती दिसत असते ,जणू काही तिच्याशिवाय या जगात दुसर कोणीच नाही अशी काही अवस्था होते त्या मुलाची .. त्याला दिसते फक्त तीच ती .. पण मग यालाच म्हणतात ना 'प्रेम ',स्वतःच अस्तित्व विसरून ,फक्त तिचा विचार करणे ,आणि स्वतःला विसरून फक्त तिचा होऊन जाणे … 
एके दिवशी ती विचारते कि तुला माझी किती आठवण येते ,तेव्हा तो म्हणतो तू माझ्या डोळ्यासमोरून जायला तर पाहिजे ,तू तर मला दिसतेस ,सगळीकडे आणि सगळ्यामध्ये … 

मनात तू ध्यानात तू 
नकळत पडणाऱ्या स्वप्नात तू 
ध्यास तू विश्वास तू 
आनंदी मनाचा निःश्वास तू … 

पानात तू फुलात तू 
पहिल्या पावसाचा सुवास तू 
रागात तू प्रेमात तू 
नुकत्याच फुललेल्या कळीत तू … 

चहात तू पाण्यात तू 
नारळाच्या गोड गोड शहाळ्यात तू 
दिवस तू रात्रीही तू 
चमकणाऱ्या हजारो चांदण्यात तू … 

इकडे तू तिकडे तू 
दिसणाऱ्या प्रत्येक चेहऱ्यात तू 
श्वासात तू आवाजात तू 
भिरभिरत्या नजरेच्या शोधात तू …. 

वाऱ्यात तू झऱ्यात तू 
बागेतल्या सुंदर पाखरात तू 
माझ्यात तू माझी तू 
सगळीकडे फक्त तूच तू … 


                                                                                                                        - सुधीर
                                                                                                                         9561346672

Saturday 29 March 2014

सवय ..

               
                    सवय .. जिथे जीवन आल तिथ भावना आल्याच आणि जिथ भावना आल्या तिथं सवयी या आल्याच , आणि जिथ माणूस आहे तिथ तर सवयी या हमखास आल्याच .. आणि जिथे कुठे एकापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र राहतात ,मग ते घर असो वा हॉस्टेल असो ,तिथे एकेमेकांच्या सवयी सांभाळून न घेता आल्यानेच भांडणे ,वादविवाद होतात ..
             कुणाला उठल्या उठल्या चहा घ्यायची सवय ,तर कुणाला रोज-रोज आंघोळ न करायची सवय ,कुणाला पालथ झोपायची सवय तर कुणाला झोपताना गाणे ऐकायची सवय ,कुणाला बाथरूम मध्ये गाणे म्हणायची सवय तर कुणाला जेवताना टीव्ही पहायची सवय ,कुणाला भरपूर बोलायची सवय तर कुणाला शांत बसायची सवय ,कुणाला बसून अभ्यास करायची सवय तर कुणाला बाहेरच खायची सवय ,कुणाला कोड्यात बोलायची सवय तर कुणाला काहीपण फालतू बडबड करायची सवय .. अशा कित्येक सवयींच्या कित्येक मुलांसोबत राहायचा प्रसंग आला हॉस्टेल वर ,तेव्हा अस वाटायचं कि कसल्या या सवयी पोरांना ,ही पोर असल्या सवयी बदलत का नाहीत ?पण आत्ता विचार केल्यावर दिसते त्यातली मजा ..
                आपल्याला सवय लागते म्हणजे आपल्या काही ना काही भावना त्या सवयीमागे जडलेल्या असतात ,काहीतरी भूतकाळ ,कुठलीतरी व्यक्ती किंवा एखादी आठवण त्या सवयीमागे दडलेली असते .. माझा एक मित्र आहे त्याला एखाधी साधी गोष्ट पण फिरवून फिरवून सांगायची सवय आहे ,पण त्याच्या याच सवयीमुळे त्याचं बोलण मजेशीर होऊन तो अनोळखी व्यक्तींसोबत सुद्धा मिसळून जातो लगेच ,मग त्याच्या या सवयीला नावं ठेवण्यात काहीच अर्थ नाही ..
                   म्हणून एकत्र राहत असताना एकमेकांच्या सवयींकडे वेगळ्या दृष्टीने पहायची गरज आहे .. एकत्र राहण्याची खरी मजा आहे ती एकमेकांच्या सवयी समजून घेऊन त्यातली मजा लुटण्याची ,म्हणजे आपण जे एकत्र राहताना एकमेकांना सांभाळून घ्यावं लागतं अस म्हणतो ते खर पाहायला गेल तर एकमेकांच्या सवयींना सांभाळून घ्यायच असत .. एखाद्याला एखादी सवय आहे ,तर त्यातल्या चुका काढण्यापेक्षा त्या सवयी कडे मजेच्या नजरेने पाहिलं तर खरच ते एकत्र राहाण मजेशीर बनून जात हाच माझा अनुभव आहे आणि दुसर्यांच्या सवयींमधल उणदुण काढत बसलं कि होतात वादविवाद  ..
                  म्हणून सोबत राहणाऱ्यांच्या सवयींची मजा घ्या ,त्या सवयींकडे खेळकर नजरेने पाहिलं तर दिसून येईल त्या व्यक्तीच व्यक्तिमत्व ,या सवयीतूनच समोरच्याच मन पण जाणून घेत येईल आणि मन समजल्यावर माणूस समजायला किती वेळ लागतो ,नाही का … 
               
                                                                                                                       - सुधीर 
                                                                                                                        9561346672

Tuesday 25 March 2014

शब्द ...

             
               परवाचं एक गाणं सहज कानावर पडलं , एक नवीन मराठी चित्रपट येतोय "पोस्टकार्ड" त्या मधल आणि ते गाणं आहे "शब्दां"वर .. तसं नेहमी शब्दांनी गाणी तयार होतात  ,पण या शब्दांवरच यावेळेला गाणं लिहिल्यामुळे ते शब्दही खुश झाले असतील ..
              शब्द .. या जगात एखादी नवी गोष्ट निर्माण करू शकणारा निसर्ग आहे आणि त्यानंतर सजीव ,पण अजून एक जण आहे जो रोज नवनवीन काहीतरी निर्माण करत असतो ,तो म्हणजे शब्द .. या शब्दाची एक गोष्ट मला खूप खास वाटते ,कि हे शब्द अगदी क्षणात ,क्षणाचाही विलंब न लावता एखाद नवीन नात तयार करू शकतात आणि क्षणातच असलेल जुन नात तोडू पण शकतात .
              शाळा वा कॉलेज मध्ये भेटलेल्या कुणा एका अनोळखी मुलासोबत बोललेल तेच थोडे शब्द ,ज्यांनी निर्माण केल आयुष्यभराच न तुटणार मैत्रीच ते नात .. कुठल्यातरी वळणावर कुणालातरी केलेल्या मदतीमुळे त्यांच्याकडून मिळालेले ते आशीर्वादाचे शब्द ,हे स्वतःविषयी अभिमान निर्माण करून गेले .. तर कधी वाढदिवसादिवशी अचानक आलेल्या एखाद्या जुन्या मित्राच्या कॉल येतो आणि जेव्हा तो म्हणतो कि "कसा आहेस मित्र ,बर वाटल तुझाशी इतक्या दिवसांनी बोलून" तेव्हा मनामध्ये जो आनंद निर्माण झाला तो निराळाच होता .. समोरासमोर भेटलो नसतानासुद्धा फक्त फोनवरच्या बोलण्यान दूर कुठेतरी राहणार कुणीतरी आपलसं होऊन जात ,ती पण या शब्दांचीच कमाल नाही का .. 
               माझ्यासाठी हा शब्द म्हणजे एक सखा आहे ,जेव्हा कोणी नसत सोबत तेव्हा याच शब्दांची सोबत मिळते ,आणि मग याच्या सोबतीने लिहितो बरच काही मनातल .. कधी कधी वाटत कि हे शब्द नसते तर माझ्या आयुष्यात इतकी नाती तयारच झाली नसती ,ना मनातल्या भावनांना वाट मोकळी करून देता आली असती … तेव्हा माझा कधीही साथ न सोडणारा सखा झाल्याबद्दल या शब्दांचे शतशः आभार ..
                        शब्दा शब्दा तुझी कमाल कसली
                        तुझ्यात सामावली नाती सगळी ,
                        तुझ्यामुळे हसलो तुझ्यामुळे रडलो
                        पण शेवटी तुझ्याच प्रेमात मी पडलो …
                     
                     
                                                                                                                           - सुधीर
                                                                                                                           

Saturday 22 March 2014

भेटशील कधी सांग मला ..

                           "तो" .. खर प्रेम आयुष्यात येण्याची वाट पाहत असलेला .. खर प्रेम करणारी "ती" आयुष्यात एक ना एक दिवस येणार यावर पक्का विश्वास असलेला "तो" .. आणि विश्वास ठेवा ,त्याच्यासाठी जगातला सर्वात मोठा इंतजार जर कुठला असेल तर तो हाच आहे , "ती" आयुष्यात येण्याची वाट पाहणे .. 
आणि या वाटेवरचा पहिला मुक्काम लागतो तो स्वप्नांचा .. स्वप्न ज्यात तो तिला पाहतो , भेटतो आणि अनुभवतो तिचं असण ..
         
           स्वप्नी येतेस तू
           भेटशील कधी सांग मला ..
           आणि भेटशील जेव्हा
           ओळखू तुला कसा ते सांग मला …

अस म्हणतात कि स्वप्नांमध्ये आपल्याला फक्त आपण पाहिलेले चेहरेच दिसतात ,त्याने तर तिला पहिलेच नाही .. तरीपण मनापासून तिची वाट पाहणाऱ्या "त्या"ला "ती" स्वप्नात न दिसूनही दिसते .. चेहरा दिसत नसला तरी "ती"च हसण दिसू लागत त्याला .. 
       
          पहिल्या वहिल्या भेटीत
          हसशील कशी ते सांग मला ..
          आणि तुझ्या त्या हसण्याने
          भूलवशील कधी ते सांग मला …

आणि मग ते स्वप्न बनून जाते "ती"च्या सौन्दर्याच वर्णन ,तिच्या डोळ्यात पहिल्यांदा पाहून अक्षरश त्याला लाज वाटते इतक प्रेम असत त्या डोळ्यांमध्ये .. आणि तिच्या ओठांकडे हा पाहतो तेव्हा कधी एकदा "ती" त्या ओठांनी त्याच नाव घेऊन बोलावते अस होत त्याला ,कारण कुणीतरी हक्कानं बोलावणारं आणि हाक मारणारं असावं हेच तर त्याला हव आहे .. 

        पाणीदार नयनांच्या नजरेने
        लाजवशील कधी सांग मला ..
        नाजूक ओठांच्या कळीने
        बोलावशील कधी सांग  मला  …


तिचा स्पर्श अनुभवायला आतुर आहे तो ,तिचा आवाज ऐकायला उत्सुक आहे तो आणि खर सांगायचं तर स्वप्नात ती आल्यामुळे ,जमिनीवर असूनही स्वर्गात आहे तो .. 

     कोमल अशा हातांच्या स्पर्शाने
     सुखावशील कधी सांग मला ..
     नाजूक अशा तुझ्या आवाजाने
     रिझवशील कधी ते सांग मला ...

तिच्या प्रेमात आकंठ बुडायला तयार आहे ,कुणीच केल नसेल एवढ प्रेम तिच्यावर करायला तयार आहे ,तिच्या मिठीमध्ये स्वतःला पूर्णपणे हरवून द्यायला तयार आहे .. फक्त "ती" भेटू दे ,प्रेम काय असत ते तिला दाखवायला "तो" तयार आहे ..  

     मखमली अशा तुझ्या मिठीत
     घेशील कधी सांग मला ..
     प्रेमाच्या तुझ्या रिमझिम पावसात
     भिजवशील कधी ते सांग मला …

पण स्वप्न सकाळ झाली कि तुटतच ,पण तो नाही तुटत ,कारण त्याला विश्वास आहे तिच्या येण्यावर ,म्हणुनतर स्वप्नातून जागा झाल्यावरसुद्धा तो तिची वाट पहायचं सोडत नाही .. आणि ती भेटल्यावर तिला ओळखू कसं ,याच उत्तर त्याला अजूनही मिळत नाही … 

      बस झाले आता स्वप्नात येणे
      आता भेटशील कधी सांग मला ..
      आणि भेटशील जेव्हा
      ओळखू तुला कसा ते सांग मला …

                                                                                                                      - सुधीर 

Friday 21 March 2014

आयुष्य ..

आयुष्य .. 
कधी समजणारं ,
कधी उमजणारं
कधी  नुकत्याच उमललेल्या  
फुलाच्या पाकळीसारखं आनंद देणारं ,
तर कधी क्षणातच न समजलेल 
न उलगडणार कोड बनून जाणारं हे आयुष्य .. 
आयुष्य हे एक कोडच असत ,
मनाला पडणाऱ्या अनेक प्रश्नाचं 
ते एक जाळच असत .. 
का होत ,कशासाठी होत 
या प्रश्नांना काहीच उत्तर नसत .. 
पण घडणार्या प्रत्येक घटनेत ,
काहीतरी रहस्य असत .. 
कधी वाटत मिळवीत सर्व प्रश्नांची उत्तर झटक्यात ,
पण हे सहजासहजी लाभणार भाग्य नसत .. 
आयुष्य संपत जात तरीपण 
ते शेवटपर्यंत एक कोडंच असत …  
उत्तरं मिळो अथवा न मिळो
आपण थांबायचं नसतं 
आयुष्य हे जगायचच असत .. 
आयुष्य 
कधी समजणारं तर 
कधी न उलगडणारं कोडंच असत ….  

                                                                                                                  - सुधीर 

Sunday 16 March 2014

आईच असते ...

आजच्या दिवशी काहीतरी छान लिहावं वाटत होत आणि मनात पाहिलं आली ती हि मी मागे कॉलेज मध्ये असताना लिहिलेली कविता .. हि कविता मी लिहिली माझ्या आयुष्यातल्या सर्वात अशा खास माणसासाठी .. माझ पाहिलं प्रेम तीच .. जगाने मला नेहमी नाकारलं असल तरी प्रत्येक वेळी ,प्रत्येक बाबतीत मला होकार देणारी तीच .. माझी आई ..

जीवनात मिळो कोणीही कधी
पण आई म्हणजे आईच असते ,
नाही तिला जगात तोड
अशी ती बेजोड मायेची ऊब असते ..…

मला एक जादूची छडी दिलीय देवाने जन्मापासून ,ती म्हणजे माझ्या आईचा मायेचा हात .. कधी अस्वस्थ झालो ,कधी संघर्ष करताना दमछाक झाली ,कधी वेगळ्या वाटेनी जायची भीती वाटली तेव्हा तेव्हा आईचा फक्त  डोक्यावरून हात फिरवण च काफी असायचं आणि आजही आहे .. 

वाटली भीती कधी कशाची
जवळ घेऊन बसणारी आईच असते ,
झोपेलेलो असताना गुपचूप येउन
डोक्यावरून हात फिरवणारी आईच असते ..…

लहानपणापासून खुपदा खेळताना ,मग तो मैदानावरचा खेळ असो वा हा आयुष्याचा निष्ठुर खेळ असो ,जखमी अनेकदा झालो , तेव्हा घरी आल्यावर मायेचा मलम लावणारी माझी आई आणि ती आहे म्हणुनच जखमांना भिउन थांबू वाटत नाही ,बस बेधडक पुढे जाव वाटत आणि आयुष्याचा प्रत्येक खेळ जिंकावस वाटत ..

खेळताना जर लागले कधी
मायेचा मलम लावणारी आईच असते ,
म्हणूनच नाही लागत कुठला वैद्य फकीर
जेव्हा माझ्या जवळ माझी आई असते ..…

कधी चुकीच वागलो तर आईपण खूप रागावते ,डोळ्यात पाणी येईपर्यंत रागावते .पण त्याच रात्री जेवताना जवळ घेऊन प्रेमान घास हि आईच भरवते ,मायेच्या भाषेत समजूत आईच काढते .कित्येकदा तिच्या मनासारखं नाही वागत मी ,तरीपण माझ सर्व काही वागण तिच्या हृदयात सामावून घेणारी माझी आई ..

कितीही रागावली असेल कधी
प्रेमाचा घास भरवणारी आईच असते ,
हजार नखरे माझे सहन करून ते
हृदयात सामावून घेणारी आईच असते ….

घरात वडिलांच्या रागावण्यापासून ते भावंडांच्या भांडणापर्यंत ,मध्ये पडून मला वाचवणारी आणि प्रेमाखातर माझी बाजू घेणारी माझी आईच असते .इथे एक कमाल दिसून येते ,मला रागावणारे वडिलपण माझ्या चांगल्यासाठीच रागावतात आणि माझी आईपण चांगल्या भावनेनेच माझी बाजू घेते ,हा आई-वडिलांचा अजब खेळ माझ्या तर समजण्यापलीकडचा आहे .. 

कितीही रागावले पप्पा जरी
माझी बाजू घेणारी आईच असते ,
पप्पांचही प्रेम असत माझ्यावर तरी
त्यांना मला रागावू न देणारी आईच असते ….

मात्र  'अभ्यास' या बाबतीत ,आई म्हणजे माझे वडीलच होऊन जाते ,नाही केला तर रागावून बसवते ,आणि केला तर ती मनातून तर खूप खुश होते ,पण ते चेहऱ्यावर न दाखवता ,'अजून कर' अस म्हणून यशाने हुरळून न जाण्याचा आयुष्यातला एक अद्भुत पाठ आईच शिकवून जाते  .. 

अभ्यास नाही केला कधी
रागावून बसवणारी आईच असते ,
तर कधी मनातल कौतुक लपवून
माझे दुसरे वडील होणारी आईच असते …

शाळेनंतरचा खुप काळ मी परगावी शिकण्यात घालवला आणि तेव्हा खर कळली आईच्या हाताच्या त्या जेवणाची किंमत ,आई जवळ असण्याची किंमत .परंतु माझ्या दूर राहण्याने त्या माउलीच्या मनाची काय अवस्था होत असेल ,हा विचार करूनच कसतरी वाटत .. 

दूर जाता मी घरापासून
खूप रडणारी आईच असते ,
परत येता कधी घरी
मिठीत घेणारी आईच असते ….

बाहेरगावी असताना जेव्हा कधी आईचा फोन यायचा तेव्हा पाहिलं प्रश्न ती विचारायची 'जेवलास का ?'
,अर्थात तिलापण हे माहित असायचं कि मी जेवाणारच आहे ,स्वतःची एवढी काळजी तर प्रत्येकजण घेतोच ,तरीपण ती रोज हा प्रश्न विचारायची कारण त्यामागे दडलय तीच ते प्रेम ,जे ती शब्दात नाही सांगू शकत ,म्हणून ती अशा प्रश्नांमधून ते दाखवते .. 

प्रेम करणारे तर अनेक असतात
खर प्रेम करणारी आईच असते ,
प्रेम दाखवणारे तर खूप बोलतात
पण शब्दाविना प्रेम करणारी आईच असते ….

म्हणूनच ,
विचारू नका मला कि
आई म्हणजे काय असते ,
सर्व प्रश्नांना एकाच उत्तर कि
आई म्हणजे आईच असते ……

                                                                                                          - सुधीर 

Tuesday 11 March 2014

आली लहर ,केला कहर

       
            Fools rush in there where angels fear to tread .. या इंग्रजी म्हणीचा अर्थ असा कि जिथे देवदूत सुद्धा जायला मागेपुढे पाहतात तिथे मूर्ख बेधडक जातात .. हि म्हण वाचताच मनात आल ,कि त्या मूर्खाना तिथे पुढे गेल्यावर काय मिळत असेल ,आनंद कि दुख .. अगदी हेच लागू होते ,आपण मागचा-पुढचा विचार करून घेतलेले निर्णय आणि अगदी बेधडक ,कुठलाच विचार न करता घेतालेले निर्णय यांना ..
           आज मी माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्याचा विचार करतो तेव्हा मला स्पष्ट दिसतंय कि ज्या घटना ,जे क्षण मला मनापासून आनंद देतात ,जे आठवलं कि ओठावर नकळतच हसू येत ,त्या सर्व घटना ,ते सर्व क्षण मला मिळाले कारण मी तेव्हा कुठलाही मागचा-पुढचा विचार न करता घेतलेल्या काही निर्णयांमुळे .. जेव्हा जेव्हा शंभरदा विचार करून निर्णय घेतला तेव्हा त्यानंतर घडलेल्या घटना चांगल्या ,फायद्याच्या होत्या यात काही वाद नाही ,पण त्यात ती मजा नसायची जी बेधडक ,कुठलाही मागचा-पुढचा विचार न करता घेतलेल्या निर्णयानंतर घडलेल्या घटनांमध्ये होती … 
          आयुष्यात प्रवास तर खूप केला ,पण अचानक एका सकाळी कुणाचीतरी आठवण आली आणि भेटावस वाटल तेव्हा क्षणाचीही उसंत न घेता ,कसलीही तयारी न करता ,बाईक घेऊन केलेला तो ६ तासांचा प्रवास ,त्याची मजाच निराळी .. फळे तर रोजच खातो पण रस्त्याने जाता-जाता चिंचेच झाड दिसलं तेव्हा दगड मारून पाडलेल्या चिंचा खाण्यातली गंमतच निराळी .. रिक्षाने अनेकदा फिरलो पण रात्रीच्या १२ नंतर सिनेमा पाहून मित्रांसोबत हॉस्टेल वर परत जाताना असाच मनात आल म्हणून ३ चाकी छोट्या रिक्षामध्ये १३ जणांनी कोंबून-कोंबून केलेला त्या १५ km च्या रिक्षा-राईड ची मजांच  निराळी .. सिनेमे तर खूप वेळा पहिले पण असच मनात आल म्हणून एके दिवशी सलग लागोपाठ ३ सिनेमांचे शो पहिल्याची आठवण कधीच न विसरता येण्यासारखी .. 
            अशा अजून अनेक घटना आठवतात ,ज्यांचा आत्ता विचार करतो तेव्हा वाटत कि किती बालिश आणि मूर्ख होतो मी तेव्हा त्या गोष्टी करताना .. पण या अशाच गोष्टी आज मनाला आनंद देतात आणि वाटत कि बर झाल तेव्हा त्या गोष्टी केल्या ते .. पण बेधडक घेतलेल्या निर्णयांमुळे काही काही त्रास देणाऱ्या आठवणी सुद्धा मिळाल्या .. मिळालेला नकार असो वा जिवलग मित्रापासून निर्माण झालेला दुरावा ,दूर गेलेले माणसे असो वा आपल्याच माणसांनी न दिलेली साथ .. या गोष्टीपण अशाच काही बालीशपणाच्या निर्णयांमुळे मिळाल्या हे जरी खरे असले तरी याचमुळे मला आठवणींचा असा खजाना मिळाला जो मला वेळोवेळी एकांतात साथ देतो .. आणि खर म्हणायचं तर अशा वेळी जे कुणी आपल्यासोबत होते ,त्या माणसांना आपण आयुष्यभर विसरत नाही कारण या सुंदर आठवणींचे ते पण भागीदार असतात .. जेव्हा जेव्हा मागचा-पुढचा विचार न करता बेधडक वागलो त्या नंतरच्या गोष्टी आठवून मनाला आनंद मिळतोच ,थोडा त्रास ही होतो यात पण मला मिळते ती 'अनुभव' नावाची हि शिदोरी जी आयुष्यभर पुरते .
          निर्णय घेताना आपल्याला वाटत राहते कि आपण योग्य ,शहाणपणाने निर्णय घेत आहोत ,आणि म्हणूनच आपण तोलून-मापून निर्णय घेत राहतो ,आणि हे योग्यच आहे .. तरीपण कधी-कधी बालिशपणे ,कुठलाच विचार न करतापण निर्णय घेऊन तरी पहा ,आयुष्य कसे मजेशीर होते ते ..शहाणपण हे आयुष्यासाठी पूरक असतेच ,पण त्यावर मूर्खपणाच,बालीशपणाचं थोड-थोड मीठही टाकल तरच त्याला चव येते ..
           तेव्हा हा शहाणपणाचा मुखवटा काढा आणि तुमच्या मनाचंही कधी कधी  ऐका .. ते म्हणतात ना  "आली लहर ,केला कहर " अगदी तसच ….

                                                                                                             - सुधीर