Thursday 23 January 2014

आता तरी सोडा

       
         
              आज हा लेख लिहावासा वाटला कारण मन खूप अस्वस्थ आहे .. नुकतच "मुक्तांगण" या संस्थेचा नुकताच केलेल्या सार्वेक्षणाचा रेपोर्ट आला आणि मन हादरून गेले ,त्या रेपोर्ट नुसार सध्या १६ ते २६ या वयोगटातल्या मुला-मुलींचं दारू ,सिगारेट आणि तंबाखू याचं सेवन करायचं प्रमाण इतक वाढल आहे कि चिंताजनक परिस्थिती आहे .. खरच काय मिळत या मुलांना हे जीवघेणे प्रकार करून ???
           माझ्या मनात राहून राहून हाच विचार येतोय कि आपल्या भारतात ,आपला देश संस्काराचा ,पवित्र परंपरांचा ,तरीपण हि मुल या विषाच्या आहारी का जातायेत ,स्वतःचा जीव एवढा का स्वस्त वाटतो यांना ,का हे जगण खेळ वाटायला लागल आहे या मुलांना .. यांना हे काळत कस नाही कि जी दारू ते आज मजेत पीत आहेत तीच दरू एक दिवस याचं आयुष्य पिउन टाकणार आहे .. जी तंबाखू आज हे आवडीने चघळत आहेत तीच तंबाखू एक ना एक दिवस याचं आरोग्य चघळून टाकणार आहे .. ज्या सिगारेट च्या धुरात आज या मुलांना अभिमानाने उभ रहावस वाटत तोच धूर यांच्या भविष्याला असाच धूर-धूर करून टाकेल ..
         आपण आपल्या घरातल्या माणसांसोबत जे सण साजरे जे क्षण एकत्र घालवतो ,तेव्हा आपल्याला मिळणारा आनंद खरा ,सुख-दुखाच्या वेळेला आपल्या माणसांचा जो साथ मिळतो ती साथ खरी ,जगण्याची खरी मजा खरा आनंद हा प्रत्येक क्षण जगण्यात ,आपल्या आप्त लोकांच्या सानिध्यात सुख-दुखात राहण्यात आहे ,पण या व्यसनापायी या मुलांची आनंदाची व्याख्याच बदलली आहे ,जगण्याची खरी मजा ऐश करण्यात ,दारू ढोसंण्यात ,सिगारेट फुंकत बसण्यातच आणि जो मित्र असल्या बाबतीत आपल्याला साथ देतो तोच आपला खरा साथ देणारा ,असले नको ते गैरसमज वाढतोय या मुलांत ..
          स्वतःच आयुष्य हे फक्त स्वतःच नसत ,आपल्या आयुष्याशी कित्येक आयुष्ये जोडलेली असतात ,तेव्हा स्वतःच्या आयुष्यासोबत असे खेळताना एकदा आईवडील किंवा आणखी कोणी असतील त्यांचा विचार करा ...  अरे तुमच्या पोटात अन्न जाव म्हणून कित्येक वेळा त्या आईवडीलानी स्वतःच्या पोटाला चिमटा काढलेले असतो आणि आज थोडी अक्कल आली तर तुम्ही त्याच पोटात दारूचे प्याले आणि सिगारेटचा धूर सोडताय ,कसली आहे हि विचारसरणी या तरुणांची .... रस्त्यावरच डुकर सुद्धा चिखलात लोळत ते त्याच्या शरीराला थंडावा मिळावा म्हणून ,म्हणजेच ते डुक्कर सुद्धा स्वतःच्या चांगल्यासाठीच चिखलात लोळते पण हे तरुण कुठल्या असुरी खोट्या आनंदापायी या व्यसनाच्या चिखलात रुतत चालले आहेत याचा विचार व्हायला हवा ..
         व्यसन हे सुटायला अवघड असत अस म्हणतात ,पण मनात खरी इच्चा असेल आणि आईवडीलांचा आशीर्वाद असेल तर काहीही अशक्य नाहीये ... अरे आपण विवेकानंद ,रामदास यांच्यासारख्या त्यागमूर्तींचे वंशज .. शिवाजी महाराज ,भगत सिंग यांच्यासारख्या देशासाठी लढणाऱ्याचे वंशज ,म्हणून या व्यसनाशी लढण आपल्याला अवघड नाहीच आहे .. गरज आहे ती फक्त आपण कोण आहोत ,का आहोत आणि काय करत आहोत ते ओळखून जाग होण्याची ...... शेवटी मी कुठतरी वचलेलं एक वाक्य आठवत ,
                                "Your life does not get better by Chance ,It gets better by Change"

                                                                                                       - सुधीर 

Sunday 19 January 2014

मुक्ती विठ्ठलाची

                             
                             सुप्रीम कोर्टाने पंढरपूर च्या विठ्ठल मंदिरातून बडवे आणि उत्पात यांची हकालपट्टी केली आणि सर्व विठ्ठल भक्तांना हायसे वाटले .. पेपर मेडिया मधून लगेचच बातम्या येऊ लागल्या कि विठ्ठल मुक्त झाला ,विठ्ठलाची सुटका झाली .. पण विठ्ठल मुक्त झाला का ? याचे उत्तर आहे कि नाही ,अजून तरी नाही .. विठ्ठल अजूनही बंदिस्त ठेवलाय त्याच्याच भक्तांनी .. सर्व संत मग ते संत ज्ञानेश्वर असो व तुकाराम ,त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले या विठ्ठलाला मुक्त करण्याचे आणि त्याचाच परिणाम म्हणून विठ्ठल काही अंशी मुक्त झाला पण पूर्णपणे नाही
                              सर्वप्रथम एका मोठ्या गैरसमजाने विठ्ठलाला भक्तांनी त्याला मूर्तीतच बंदिस्त केला आहे तो म्हणजे कि तो फक्त तिथच मूर्तीतच आहे ,ज्ञानेश्वरापासून ते तुकाराम ते बहिणाबाईपर्यंत सर्व सांगून गेले कि सर्व प्राणीमात्रा मध्ये तोच विठू आहे ,सर्व जीवांमध्ये सर्व फ़ुलांमध्ये तोच जिवलगा आहे ,सर्व रंगांमध्ये तोच पांडूरंग आहे पण त्याचे भक्त च ते मानायला तयार नाहीत .. आजही पंढरपूरच्या मंदिराबाहेर कित्येक भिकारी ,अगदी थोड्याशा जास्त पण नाही एवढ्या दानाची अपेक्षा करत बसलेले असतात ,मात्र विठूराया च्या भक्तांना त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ कुठेय  .. दर्शन रांगेत ३ तास लागले तरी उभा राहायला ते तयार असतात पण मंदिराच्याच बाहेर एका मिनिटात सापडणार्या त्या गरीब माउलीकडे ढुंकूनही पाहायला वेळ नसतो .. विठ्ठलाला हजारो रुपयांचे अभिषेक केले जातात पण एखाद्या भुकेल्याला १० रुपये द्यायला पण कोणी पुढे येत नाही ..
                           रोजच्या आयुष्यात समोरच्या माणसांना किंमत न देता कसेही वागवतात आणि विठ्ठलाच्या फोटोला मात्र न चुकता हार घालतात .. स्वताच्या आई-वडिलांना किंमत देत नाहीत आणि पुंडलीकाला तो विठू त्याच्या आई-वडिलांच्या सेवेमुळेच प्रसन्न झाला हे विसरून निर्लज्जासारखे त्याच्याच पाया पडतात .. त्याच्या रुसलेल्या बायकोला म्हणजेच रुक्मीणीला मनवायला म्हणून विष्णू इकडे आला याच भान न ठेवता सर्रास स्त्रियांना मग ती बायको असो वा मैत्रीण व बहिण ,तिला शिव्या द्यायच्या आणि विठ्ठलासमोर येउन हरिपाठ म्हणायचा ..
                           एकादशी चा दिवस ,म्हणजे चिंतन मनन करत पोटाला उपाशी ठेवत ,भूक लागलेलि असताना पण विठूच्या नामाचा गजर करत आनंदात घालवायचा तो दिवस पण त्या दिवसाला पण फक्त उपवास धरायचा मुहूर्त करून टाकलाय नाही का ,गळ्यात माळ घालायची आणि सर्रास घाणेरडी कामे ,घाणेरडे बोलण करत फिरायचं ,त्या माळेला पण फक्त मटण न खाण्याच कारण बनवून ठेवलय ,बाकी काहीही करा कसाही वागा ती माळ घालून ,खरच विठ्ठलाला त्याच्या भक्तांचा हा ढोंगीपणा कळत नसेल का ..
                          आज तो विठ्ठलहि म्हणत असेल कि बाबा रे त्या बडव्यांच्या तावडीतून सोडवलत ,आता तुमच्या मनाताल्या बडव्यांना कधी दूर करताय ..  तो म्हणत असेल अरे डोळे उघडून पहा जरा ,मी सगळीकडे आहे ,मला फक्त मूर्तीत नका रे कोंडून ठेऊ .. खरा वैष्णव धर्म मानायचा असेल तर ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी आणि तुकाचे अभंग समजून घ्या ,नुसते पारायण नका करत बसू .. शेवटी एकच म्हणावेसे वाटते कि
                              व्यर्थ गेले तुका अन ज्ञानेश्वर व्यर्थ गेले
                              सर्व संताचे बोल जणू फुकाचे गेले ।।